किरकोळ महागाई वाढीचा दर कमी   

एप्रिलमध्ये सहा वर्षांतील सर्वात कमी ३.१६ टक्के 

नवी दिल्ली : किरकोळ महागाई वाढीचा दर सहा वर्षांत एप्रिलमध्ये ३.१६ टक्के पर्यंत कमी झाला आहे. भाजीपाला, फळे, डाळी आणि प्रथिनेयुक्त पदार्थांच्या किंमती कमी झाल्याने महागाई वाढीचा दर कमी झाल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून जूनमध्ये नाणेनिधी धोरणाचा फेरआढावा घेताना व्याज दरात कपात करण्याची शक्यता वाढली आहे.
 
महागाई संदर्भातील ग्राहक किंमत निर्देशांक मार्चमध्ये ३.३४ टक्के होता. एप्रिल २०२४ मध्ये तो ४.८३ टक्के होता. जुलै २०१९ मध्ये ३.१५ टक्के होता. मार्चच्या तुलनेत एप्रिल २०२५ मध्ये अन्नधान्यांची महागाई ९१ अंकानी कमी झाली. ऑक्टोबर २०२१ पासून महागाई वाढीचा दर कमी होत चालला होता. तो एप्रिल २०२५ मध्ये सर्वात कमी झाला. एप्रिलमध्ये अन्नधान्य महागाईचा दर सर्वात कमी १.७९ टक्के होता. मार्चमध्ये तो २.६९ टक्के तर गेल्या वर्षी याच महिन्यात तो ८.७ टक्के होता, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने मंगळवारी स्पष्ट केले. 
 
महागाईचा दर ४ टक्केपर्यंत असावा, असे रिझर्व बॅकेला वाटते. त्यामध्ये पुढे आणि मागे २ टक्के बदल होणे शक्य आहे. त्यामुळे व्याजाचा दर फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये अर्धा टक्के कमी केला होता  कारण किंमतीमध्ये सुधारणा झाली होती. बँकेच्या नुसार ग्राहक किंमत निर्देशांक या आर्थिक वर्षांत ४ टक्के असेल. चौमाहीत तो ३.६ टक्के, द्विमाहीत तो ३.९ टक्के, तिमाहीत ३.८ टक्के आणि चौमाहीत तो ४.४ टक्के असेल, असा अंदाजही वर्तविला आहे.
 
एकंदरीत एप्रिलमध्ये अन्नधान्याच्या किंमती कमी झाल्यामुळे महागाई वाढीचा दरही कमी झाला आहे.  बटाटा, टोमॅटो, चिकन, तूरडाळ आणि जिर्‍याचे दरही कमी झाले आहेत. खाद्यतेलाचे दरही कमी झाले आहेत. त्यामध्ये मोहरी, सनफ्लॉवर, सोयाबीन तेलाचा समावेश आहे. सरासरी १९.६ टक्के ते २३.७५ टक्के दर घटले आहेत. 
 
एप्रिलमध्ये ग्रामीण महागाई वाढीचा दर २.९२ टक्के होता. मार्चमध्ये तो ३.२५ टक्के होता. शहरी महागाई वाढीचा दर मार्चमध्ये ३.४३ वरुन  एप्रिलमध्ये ३.३६ टक्के घसलला होता.

Related Articles